Sunday, September 7, 2008

असतो जर मी...

कधी तरी कुठे तरी अचानक उगवलेल्या ओळी. काही लक्षात राहिल्या, बऱ्याच विरून गेल्या. हुरहुर वाटते ते विरून गेलेल काय होत, कस होत? स्वतःचाच राग येतो. विसरलो? आपल्याच ओळी आणि आपणच विसरलो! मग आतून दुसरा आवाज. "छोड़ ना यार वैसे भी आज सन्डे है" किंवा "एक जाती है तो दूसरी आती है" तत्सम.  

तथापि जे काही आहे ते अस आहे.  

असतो जर मी एक चारोळीकार... 
(खालील मजकूर मी माझा, तू तुझा, हा त्याचा, तो याचा अश्या कुठल्याही चतकोर पुस्तकातून घेतलेला नही :) )
वादळ
शांत हो वाऱ्या शांत हो
शांत हो वाऱ्या शांत हो  
येणारं मी वादळ आहे
तू वादळापूर्वीची शांतता हो  
शांत हो वाऱ्या शांत हो  

असतो जर मी एक बंडखोर कवी...
उभारी
चाललीये सर्वत्र निवडणुकीची तयारी
जो तो म्हणतो घ्या राखेतून भरारी
अरे इथे स्वतःला जाळणाऱ्या तेलाचीच उधारी
कस घेइल मन उभारी

असतो जर मी एक शायर...
तनहाई
आप चले गए तो ऐसी तनहाई छाई
आप चले गए तो ऐसी तनहाई छाई
इतने तनहा हो गए की तनहाई का भी साथ ना रहा

याद
इस नाचीझ की याद की आपने तो जमाना याद आ गया
इस नाचीझ की याद की आपने तो जमाना याद आ गया
आपने रुखसत की तो हम ज़माने को भुलाके आ गए